वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं|| निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा||
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं||
निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा||
शुभ कार्याच्या वेळी प्रथम ज्याचे पूजन केले जाते. त्या विघ्नहर्त्या गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता. माघ शुद्ध चतुर्थी ही "गणेश जयंती" म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेश तत्व हे नेहमीपेक्षा सहस्त्रपटीने कार्यरत असते. या दिवशी गणेश उपासना केल्यास गणेश तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला होतो. देवाच्या विविध उपासने पैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ उपासना तसेच सोपी सुलभ आणि देवतेसी सतत अनुसंधानात ठेवणारी एकमेव उपासना म्हणजे 'नामजप' देवतांचा नामजप भावपूर्ण केला तरच तो देवतांपर्यंत पोहोचतो. हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभकार्याच्या आरंभी याचे पूजन केले जाते. ही बुद्धीशी देवता आहे. याच्या उपासनेने बुद्धी स्थिर राहते. कुठल्याही विकल्प शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. त्याची जर आपल्यावर कृपा झाली तरच !!आपल्या वाणीत 'वाकसिद्धी' प्राप्त होते. शक्यतो नेहमीच्या पूजेत डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा. कारण उजव्या सोंडेचा गणपती अधिक शक्ती शाली आणि जागृत आहे. त्यामुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात कर्मकांडातील नियमांचे पालन करणे शक्य होत नाही. यासाठी नेहमीच्या पूजेत डाव्या सोंडेचा गणपती ठेवला जातो. याची पूजा विधीही सोपी आहे.
गणेश जयंतीला गणपतीची स्पंदने जास्त प्रिथ्वीतलावर येत असल्यामुळे या दिवशी गणेशाला मनोभावे प्रार्थनाही करावी. व 'ओम गं गणपते नमः' हा नामजप जास्तीत जास्त करावा. तसेच 'गणेश स्तोत्र: व 'अथर्वशीर्ष' ही म्हणावे. त्यामुळे गणेश तत्वाचा लाभही आपल्याला होईल.
श्रीमती वासंती लावंघरे, सातारा.