काहीवेळा कडक उन्हाळ्यात, दही व्यवस्थित तयार होत नाही किंवा लवकर आंबट होते आणि खराब होऊ लागते. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, वातावरणातील उष्णता देखील त्यावर परिणाम करते.
कवठे, ता. वाई येथील असलेले व मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले पोलिस अंबादास पवार यांच्या पत्नीला राज्य सरकारने थेट पोलिस उपअधीक्षकपदी (डीवायएसपी) नियुक्ती दिली आहे.
नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांच्या, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजारांच्या निधीस राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने युपीएससी घेण्यात आलेल्या परीक्षेत सातारा तालुक्यातील बोरखळ गावातील कपिल लक्ष्मण नलवडे याने देशात ६६२वी रँक सह सनदी अधिकारी बनून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी सातारा शहराचा पारा ४०.९ नोंद झाला. तर माण आणि फलटण तालुक्यातील कमाल तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला.
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवछत्रपती चित्रपटाचे शूटिंग संगम माहुली येथील परिसरात सुरू होते.
सातारच्या साहित्यक्षेत्राला संजीवनी देणाऱ्या मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या १३ वर्षात विविध उपक्रम राबवले आहेत. मसाप शाहूपुरी शाखेतर्फे दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते.
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये पदाधिकारी असो वा कार्यकर्ता प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली जाते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाज राज्यातच नव्हेतर देशात अत्यंत चांगले असलेचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (पारंपारीक) 29 एप्रिल रोजी व 12 मे रोजी बुद्धपौर्णिमा यासह विविध उत्सव साजरे होणार आहेत.