ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे.
स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.
शाहूनगरमधील घरफोडीची उकल करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा शहरा लगतच्या विलासपूर येथील साई कॉलनी मध्ये रात्री उशिरा बिबट्याने भरवस्तीत येऊन कुत्र्याचे पिल्लू पळवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कांद्याच्या दरवाढीमुळे कांदा लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे कांदा बियाणे व रोपांना मागणी वाढली आहे. मात्र, जिल्ह्यात बोगस कांदा बियाणाची विक्री करुन शेतकर्यांची फसगत केली जात आहे.
ग्रामीण महाराष्ट्र स्मार्ट व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासना मार्फत आर आर आबा सुंदर गाव स्पर्धा दर वर्षी आयोजित केली जाते. याच्या मूल्यमापनाचा भाग म्हणून जिल्हा स्तरीय समितीने सातारा तालुक्यातील कळंबे गावाला भेट दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारीला जयंती साजरी करण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची पूर्व तयारी आढावा बैठक झाली.
श्री.छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सातारा जिल्हयाला अनन्यसाधारण महत्व आहे. जिल्हयात अनेक गड किल्ले आहेत परंतु या गड किल्ल्वार अस्वच्छता आहे तसेच दुरवस्था झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे देशी जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. या बाजारात कर्नाटक राज्यातील तसेच परप्रांतातील कसाई मोठ्या प्रमाणावर येथील देशी गाय व बैलांची खरेदी करतात ही खरेदी कत्तलीसाठी असते.