शाहूनगर येथे गणेश हाउसिंग सोसायटीत घरफोडी करून १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चैतन्य विशाल माने (वय १९ रा. १५० ब, रविवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे.
वाई खंडाळा महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याची शान- आन- बान वाढलेली आहे. त्यात माण अग्रक्रमी आल्यामुळे या चौकाऱ्यांमध्ये आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडीने शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनीही सातारा शहरात दमदार एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.
ख्रिस्ती समाजाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या तातडीने सोडवणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे दिले.
साताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळी माणमध्ये गेले नाही.
जम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले.
भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यात प्रचंड ताकद वाढली आहे. लोकसभेत कार्यकर्त्यांनी जो चमत्कार घडवला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक झाली आणि युतीचे आठ आमदार निवडून आले.
ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातार्यात बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे भेट घेतली.
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे.
स्व. अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते, तर कदाचित कॉंग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते. विलासराव देशमुख यांच्यापेक्षा भाऊसाहेब महाराज ज्येष्ठ असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी त्यांना का बाजूला केले; संधी का दिली नाही, हे माहीत नाही.