24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शुक्रवारी ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात झाली. सातारा शहरातल्या विविध शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये काढलेल्या चित्ररथातून भारतीय संस्कृतीचे मनोहरी दर्शन झाले. या ग्रंथ दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येथील पिरवाडी येथील मकरंद दादासाहेब केंगार यांचा बांगला अज्ञात चोरट्यांनी फोडला.पहाटेच्या वेळेस आतून लावलेल्या कड्या शांततेत तोडून प्रवेश करून दोन मोबाईल व खिसे-पाकिटातील सुमारे रु.
येथील एमआयडीसीतील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे. हे एटीएम दररोज सकाळी सात वाजता उघडून रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते.
महाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने या स्थानांचा आढावा घेऊन आराखडा बनवण्याचे निर्देश पर्यटन महामंडळाला दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे लवकरच भरवला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
हाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा.
श्री आनंद नटराज व शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने आणि श्री कांची कामकोटी पिठाचे महास्वामी, परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेन्द्र सरस्वती स्वामी ,तसेच परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व परमपूज्य विद्यमान पीठाधीपती, श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामी, यांचे पूर्णानुग्रह आणि शुभाशीर्वादाने सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरातील सर्व देवतांचा वार्षिक रथोत्सव सोहळा नटराज मंदिरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या जयघोषात ध्वजारोहण व प्रधान संकल्प होऊन प्रारंभ झाला.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडी कायम आहे. बुधवारी सातारा शहरात १४.९, तर महाबळेश्वरला १२.९ किमान तापमानाची नोंद झाली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या दुष्परिणामांची दाहकता पोहोचवण्यासाठी हरित सातारा तर्फे प्लास्टिक पिशव्या निर्मूलन उपक्रम शुभारंभ अनंत इंग्लिश स्कूलमध्ये झाला.
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती करून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सर्वसामान्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिनी मंत्रालय उभे केले.
सर्वांत जास्त अनुदानित महाविद्यालये असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंजाबराव देशमुख आदी महामानवांच्या दूरदृष्टी व शैक्षणिक चळवळीमुळे हे शक्य झाले आहे.