एकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
बुलंद या शब्दाचा अर्थ अतिप्रचंड. पण पत्रकारितेच्या क्षेत्रात बुलंद या शब्दाचा गुणात्मक अर्थ घ्यायचा झाला तर सत्यावर अटळ राहणारा, सत्याची कास धरणारा... अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता.
येत्या 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. दि. 7 ते 17 सप्टेंबर या दहा दिवसांमध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळात प्लाजमा लेझर लाईट यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे व ध्वनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी यांच्यावर कठोर कारवाई करून त्या जागेवर जप्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
सातारा जिल्ह्याचे मुरब्बी व कसलेले राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फलटणचे राजे, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही, असे वक्तव्य करून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील एसटी सेवेला परिवहन कर्मचाऱ्यांच्या कामगार संपाचा चांगलाच फटका बसला. प्रशासनाने एसटी सेवा अंशतः सेवा बाधित झाल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात सातारा जिल्ह्यातील 354 वाहनांच्या फेऱ्यांपैकी 138 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लांब पल्यांच्या सेवा वगळता जिल्हा अंतर्गत व शहरी बसची चाके थांबल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली.
'वीर मुरारबाजी' या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सातारा हिल मॅरेथॉन ही डोंगरावर होणारी संपूर्ण जगातील वैशिष्ट्यपूर्ण मॅरेथॉन आहे. साधारण १३ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न या मॅरेथॉनच्या निमित्ताने दरवर्षी साकारत आहे, याचा आनंद वाटतोय, असे प्रतिपादन खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
१८९४ साली पुण्यातील केसरी वाडा येथे टिळकांनी गणपतीच्या मातीच्या मुर्तीची स्थापना केली. गणेश उत्सव, ज्याला गणेश चतुर्थी असेही म्हटले जाते, हा एक चैतन्यशील आणि अत्यंत आदरणीय उत्सव आहे जो प्रामुख्याने महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये साजरा केला जातो. हा शुभ प्रसंग भगवान गणेशाचा जन्म दर्शवितो.
धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत.