राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाध्यक्ष इमरान मुल्ला यांच्या नेतृत्वात कराड नगरपालिकेच्या वाढीव भागातील बर्गे मळा या ठिकाणी सुविधा नसलेबाबत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यात फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीत 3 लाख 98 हजार 603 बाधित शेतकर्यांच्या 1 लाख 87 हजार 53.21 हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांच्या नुकसानीपोटी राज्य शासनाने 337 कोटी 41 लाख 53 हजार इतक्या निधीस मान्यता दिली आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे
सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कृष्णा नदीच्या पुलावरून एका तरुणीने नदीत उडी मारली. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून कल्पना बाळाप्पा वाघमारे (वय 26) असं या तरुणीचं नाव आहे.
भारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यू कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यू होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा, चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 23 गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा परिसरात उपाययोजना करण्याबाबत सातारा शहरातील विविध शाळांमधील मान्यवरांनी आज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा आपल्या शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर मोठ्या आजारांचे लक्षण बनू शकतात. अगदी हाता पायांची नखे वाढणे, शरीरावर केस असणे किंवा नसणे ही बाब आपल्याला अतिसामान्य वाटते.
भारतातील सर्व ठिकाणी राखी पाकिटांचे वितरण लवकरात लवकर होण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे राखी पाकिटे स्वीकारण्यासाठी खास स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.