कोयना एक्स्प्रेसने प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मनीमंगळसूत्र असा 4 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज दोन अल्पवयीन मुलांनी हिसकावून चोरून नेला.
देवी चौक, सातारा येथे मिरवणुकीदरम्यान डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज, बीम लाईट व एलईडी स्क्रीनद्वारे लोकांना त्रास दिल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हयात, शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या आणि महाराष्ट्र शासनासह, जिल्हा परिषद साताराने विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या, ‘श्री जानाई मळाई शिक्षण संस्था (जेमसेफ) सातारा’ या संस्थेने, संस्थेचे मार्गदर्शक-हितचिंतक-आधारस्तंभ ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून, ‘समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, माने कॉलनी, कोडोली सातारा.’ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास अभूतपूर्व-अद्भूत प्रतिसाद मिळून विक्रमी 1308 रक्त बाटल्यांचे संकलन करण्यात आले.
हेल्थ चेकअप करायचं म्हटलं की दवाखान्यात किंवा लॅबमध्ये जाऊन ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल द्यावं लागतं आणि मग त्यातून आपल्या तब्येतीचा अंदाज येतो.
सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत पोहोचवून आणि केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे.
शहरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झाला असून, मंडळांच्या गणेश मूर्तींचे आगमन होऊ लागले आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आप आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
पर्यटन विभागाकडून पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटन सुरक्षा दल हा नाविन्यपूर्ण उपक्रम महाबळेश्वर, पाचगणी या ठिकाणी राबविण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या सुरक्षा दलाने अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे.
स्वराज्याची शेवटची राजधानी असणाऱ्या सातारा शहर नगरपालिकेला सुध्दा ऐतिहासिक महत्व आहे. १५० वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या सातारा नगरपालिकेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
किल्ले अजिंक्यतारा येथे एक युवक जीवन संपवण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांनी धाव घेवून त्याला वाचवले.