जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले.
जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडली आहे. पावसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरपेक्षाही दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक 365.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर शहरातील अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्त्यांवरही पाणी जमा झाल्याचे दिसून आले.
महाबळेश्वर तालुकेतील संभाव्य दरडप्रवण व पुरप्रवण क्षेत्रात समाविष्ठ असलेले एकूण 26 गावामध्ये दरड कोसळून किंवा अचानक पूर आल्यावर शोध व बचाव पथक शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी गाव पातळीवरील नागरिकांना तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखालीआपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा.
शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अंतर्गत अंतिम मुल्यमापन कार्यपध्दती बाबत मा. उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचे कार्यालयास सादरीकरण (P.P.T) तयार करुन सादर करण्यात आली.
सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे. मात्र तरीही सातारा ठोसेघर मार्गावरील बोरणे घाट परिसरातील शेवटच्या वळणावर अचानक पहाटे दरड कोसळल्याने येथील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.
जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांविरोधात तक्रारी करुनही जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील चौकशी व वरिष्ठ अधिकार्यांकडून केवळ चौकशीचा फार्स तयार केला जात आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातले. कुशल प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना विकासप्रवाहात आणले.
पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.