जिल्ह्यात प्लॅस्टिक कचरा बंदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : मा.याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या वर दंडात्मक कारवाईस सुरुवात झालेले आहे.
सातारा : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तींच्या वर दंडात्मक कारवाईस सुरुवात झालेले आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पथके कार्यरत झालेली आलेले आहेत, तरी नागरिकांनी सावधान करणेत येते कि उघड्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीत टाकावा. जिल्ह्यात प्लॅस्टिक कचरा निर्मूलन मोहिम तीव्र करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. गावालगतचे रस्ते, महामार्गाच्या कडेला विखुरलेले प्लॅस्टिक व कचरा त्वरित संकलित करून त्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी CCTV बसविण्यात यावेत. त्यामध्ये कचरा टाकणारे नागरिक आढळल्यास कडक कारवाई करून दंडात्मक कार्यवाही करावी. हागणदारी मुक्त अभियानाप्रमाणेच कचरा निर्मूलनासाठी रात्रगस्त घालून कचरा टाकणाऱ्यांना रंगेहात पकडण्यात येणार आहे.
यासोबतच, ग्रामस्थ, महिला बचतगट, युवक मंडळे, सहाय्यकारी संस्था व ग्रामस्तरावरील सर्व कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्याकडील, नदीघाट, पुलाखालील जागा, बसस्थानके, टोलनाके, शाळा परिसर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी. असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन यांनी प्रत्येक कुटुंबाने आपल्या घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. "प्रत्येकाने एकल प्लॅस्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करावा, घरातील प्लॅस्टिक ग्रामपंचायतीच्या संकलन प्रणालीद्वारे जमा करावे," असे त्या म्हणाल्या.
महामार्गावर व गावालगत कचरा टाकून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर व्यक्तीवर व दुकानदारावर कारवाई करणेत येणार आहे.जिल्ह्यात उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरुवात झालेली आहे असे पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने भोसले यांनी सांगितले
या आदेशांच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यातील वारुंजी येथे एकल प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून ₹24,000 दंड वसूल करण्यात आला, तर गोटे येथे ₹9,000 चा दंड आकारण्यात आला. या कार्यवाहीमध्ये गटविकास अधिकारी प्रताप पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रसाद खेडेकर, पूनम पाटील, ग्रामपंचायत अधिकारी दीपक हिनुकले व जया साळुंखे यांनी सहभाग नोंदवला.
तसेच पंचायत समिती जावली चे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शना खाली ग्रा. पं. बिभवी ता जावली येथे दुकानदार यांना एकल प्लास्टिक वापर बंदी बाबत जनजागृती करणेत आली. यावेळी श्री. सौरभ टूभे विस्तार अधिकारी , सरपंच श्री. संतोष बांदल,उपसरपंच श्री. कांताराम शिंदे,ग्रामपंचायत अधिकारी श्री. चंद्रकांत कोळी, स्वछता समन्वयक श्री. संतोष जाधव, मनोज खेडकर उपस्थितीत होते.
तर जिल्हास्तरावरून जिल्हा तज्ञ अजय राऊत, राजेश भोसले, नीलिमा सनमुख यांनी वाढेफाटा, वर्ये,सैदापूर, कोंढवे, रामनगर, समर्थ नगर, कोडोली, खेड ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जात आहे अशा ठिकाणांची पाहणी करून ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत व त्या ठिकाणी उघड्यावर प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येणार आहेत.