विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्ह्यातील 3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा करण्यात आलेली आहेत.
सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेट टुगेदर म्हटलं की, हायस्कूल, कॉलेज येथील बॅचचा, ही संकल्पना. पण या सर्व बाबींपेक्षा ज्या शाळेत शैक्षणिक पाया रचला तिथे गेट टुगेदर होणे नशिबावानच मित्र म्हटले जात आहेत. झेडपीच्या शाळेतील इयत्ता चौथी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा.
महायुतीचे नेते युतीधर्म पाळत नसून रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाहीत. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीने प्रचाराच्या माध्यमातून मांडले जात नाहीत, अशी भूमिका रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून जाईल, याची काळजी घ्या. असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
महायुतीकडून दूजाभाव वागणूक मिळाल्याने आ.सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची निर्णायक बैठक उद्या १८ नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे कॉंग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल.
उरमोडी व महू -हातगेघरच्या कालव्यांची कामे पूर्ण करणार, बोंडारवाडीचा प्रश्न मार्गी लावणार, सातारा एमआयडीसीचा विकास, सातार्यात आयटी क्षेत्र येण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, हा माझा शब्द आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी पुढची पाच वर्षे मी कार्यरत राहीन, असा विश्वास सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.