विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलिसांनी सशस्त्र संचलनासह ठिकठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवले. निवडणूक प्रक्रिया कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून व्हावीत, यासाठी पोलिसांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची नसून, ती दोन विचारांची आहे. एका बाजूस शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जोपासणारी महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला संविधान व राज्यघटना मोडून पुन्हा वर्णव्यवस्था आणणारे जातीयवादी भाजप या दोन विचारांची ही लढाई आहे.
माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार हे यूपीए सरकारच्या काळात केंद्रामध्ये मंत्री होते. त्यांनी महाराष्ट्रासाठी केवळ १ लाख ९१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र, मोदी सरकारने दहा वर्षांतच १० लाख १५ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
दुष्काळी परिस्थितीत देऊर व परिसरातील गावांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी आम्ही सामुदायिक निर्णय घेऊन विविध योजना राबविल्या. परंतु त्या यशस्वी होऊ नयेत यासाठी कोरेगावच्या हुकुमशाही आमदारांनी सत्तेचा वापर करून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले.
राजकारणात शब्दाला फार महत्व आहे. स्व. भाऊसाहेब महाराजांचा वारसा आणि त्यांची कामाची पद्धत मी कायम अवलंबली आहे. मी कधीच दिलेला शब्द फिरवला नाही, दिलेला शब्द काहीही झालं तरी मी पाळतो.
सातार्याची जनता ही परिवर्तनशील आहे. सातारा शहरात विकासकामे होत नसल्याने सत्ताधार्यांच्या आश्वासनांना मतदार कंटाळले आहेत. रोजच्या पदयात्रांमधून आम्हाला त्याचा अनुभव येतो आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस व महाआघाडी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना सैदापूर (ता. कराड) गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव व सर्व सदस्य, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष सिताराम जाधव व सर्व संचालकांनी जाहीर पाठिंबा दिला.
सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरु असताना बिनधोकपणे दारु वाहतुक करणार्या टोळ्यांवर पोलिसांनी धाड टाकली. तीन वेगवेगळ्या कारवाईत सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा दारु साठा पोलिसांनी जप्त केला आहे.
प्रतापसिंहनगर येथे जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघेेजण बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.