बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीचे सातारा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी प्रचाराचा शुभारंभ केला असून सातार्यात त्यांचे प्रचार दौरे गतिमान झाले आहेत. बुधवारी सातारा पालिकेचे माजी नगरसेवक व सभापती वसंत लेवे यांच्या वाढदिवसानिमित्त अमितदादा कदम यांनी उपस्थिती दर्शवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या उपस्थितीची राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
तिरुपती भिशीमध्ये गुंतवलेले 50 हजार रुपये वेळोवेळी मागूनही ते न दिल्याने महिलेविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संशयास्पद वस्तू जवळ बाळगून फिरणार्या पाचजणांवर संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरातून अज्ञात चोरट्याने मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, मेढा येथील कुंभारवाड्यात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व धर्मातील विविध समाजातील लोकांसोबत अनोखी दिवाळी साजरी करून फराळाचा आनंद घेतला.
राष्ट्रवादी पक्षाचे दोन स्वतंत्र गट झाल्यानंतर फलटण व वाई या दोन विधानसभा मतदारसंघातून शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट प्रथमच आमने- सामने येत आहेत. सातारा जिल्हा शरद पवारांना मानतो, तर अजित पवार यांचा सुद्धा कार्यकर्ता वर्ग येथे मोठा आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघातून कोणत्या पवारांच्या विचारांना सातारा जिल्हा साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोरेगाव तालुक्यात विनापरवाना सोयाबीनचा व्यापार करुन शेतकर्यांची अडवणूक करणार्या आणि त्यांच्यावर अन्याय करणार्या व्यापार्यांवर कृषी उत्पन्न बाजार समितीने धडक कारवाई सुरु केली आहे. शेतकर्यांच्या तक्रारीवरुन कुमठे येथे व्यापार्यावर बुधवारी दुपारी 12 वाजता बाजार समितीच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून 33 हजार 371 रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला.
हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाला वेगळेपण आहे. त्यातून रुढी, प्रथा, परंपरा पाळण्याबरोबरच अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्वही त्यात दडलेले आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक म्हणून दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. गुरुवारी (दि. 31) नरक चतुर्दशी आहे त्यानिमित्त लक्ष्मी, कृष्ण, माता काली, यमराज आणि हनुमान या देवतांचे नरक चतुर्दशीच्यादिवशी पूजन केले जाते.