जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही आदेशाचा भंग करुन तसेच हातात तलवार घेवून फिरताना आढळल्याप्रकरणी सुश्रीत तानाजी सावंत (वय 21, रा. सैनिक नगर, सदरबझार, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मानसिक, शारीरिक त्रास देवून, विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकार एप्रिल ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला.
बाजूला सर म्हणाल्याचा राग धरुन पाच जणांनी युवकास मारहाण केली. हा प्रकार दि. 2 रोजी नवीन एमआयडीसीतील आदिती हॉटेलजवळ घडला.
राष्ट्रीय महामार्गावर धोकादायकरीत्या उभ्या केलेल्या कन्टेनरला (एमएच 14 केए 5245) कारची (एमएच 14 बीसी 5029) पाठीमागून धडक बसली. ही घटना रायगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर दि. 4 रोजी घडली.
शेंद्रे, ता. सातारा येथील कणसे ढाब्याच्या समोर उभ्या केलेल्या कारमधून पाच लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरुन नेले. ही घटना दि. 3 रोजी रात्री घडली.
विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू असताना सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ (शेंद्रे) येथे पोलीस विभाग आणि भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत चारचाकी मधून ९५ लाखांची रोकड जप्त केली. याबाबत प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणाऱ्या आठही विधानसभेच्या उमेदवारांना विधानसभेत पाठवण्याचे काम महायुतीतील सर्व घटक आणि कार्यकर्ते करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सातारा एक शांत शहर म्हणून ओळखलं जातं. आम्ही असू किंवा आमचे पूर्वज असुद्या, सर्वानीच साताऱ्यात जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केले. आजही मी असो किंवा उदयनराजे असतील दोघेही जातीपातीपेक्षा सामाजिक शांतता आणि सलोखा याला कायम प्राधान्य देतो. शेवटी जातीपातीच्या पलीकडेही सातारकर म्हणून आपलं एक घट्ट नातं आहे.
लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक सीरिज म्हणजे पंचायत. या सीरिजच्या तीन भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौथा सीझन भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडिओने नुकतेच जाहीर केले की त्यांच्या बहुप्रतिक्षित मूळ मालिका पंचायतच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीने सामूहिकरित्या मला उमेदवारी दिली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे, मात्र माझ्या पक्षांतरावर बोलणारे नैतिकतेची भाषा करतात. त्या अनुषंगाने मात्र त्यांचे पक्षांतर हे ठेकेदारांसाठी आहे का? अशी अप्रत्यक्ष टीका महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांनी कोणाचेही नाव न घेता साताऱ्यात केली.