सार्वजनिक आरोग्य विभाग, स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याहस्ते कर्करोग मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
कराड येथील सहापदरीकरण पुलाच्या सेगमेंटचे काम 15 मार्च रोजी सुरु होतो. यावेळी कामाप्रसंगी कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्त हानी झालेली नाही.
राज्य सरकार मधील मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक राजवाडा मार्फत कामधेनु दत्तक ग्राम योजने मधून मौजे जकातवाडी येथील महिला पशुपालकांसाठी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते, या अभ्यास दौरांमध्ये महिला पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक माहिती मिळण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे भेट देण्यात आली.
महाराष्ट्र शासन कृषि विभागा मार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालवधीत अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने 20 मार्च रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान वेद भवन मंगल कार्यालय कोरेगाव रोड येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरल्याने सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकीदारांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे.
सन 2024-2025 साठी जिल्ह्याला पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटी असून 15 मार्चअखेर 3 हजार 64 कोटी 18 लाखाचे पिक कर्ज वितरीत करुन 85 टक्के उद्दिष्ट पुर्ती झालेली आहे.
सर्व मुलांसाठी आईचे दूध सर्वात महत्त्वाचे आहे. कमी वजनाच्या नवजात मुलांसाठी तर ते अमृतासम आहे. आईच्या दुधात भरपूर पोषक आणि प्रतिपिंडे असतात जी मुलांच्या शारीरिक विकासासाठी खूप महत्त्वाची असतात.
नागरिक हा जन्मापासून ते मृत्यनंतरही ग्राहक असतो. ग्राहकांच्या हितासाठी कायद्यात अनेक तरतुदी आहेत.