सातारा शहरातील तालुका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या शिवतेज हॉलजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता कारची महिला पादचारीला धडक बसल्याने त्यात ती ठार झाली.
ज्ञानमुद्रा साहित्य समूहातर्फे राजमाता जिजाऊ काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करतात. भोगवटा वर्ग २ जमिनीवर बोजा आकारता येत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहावे लागते.
बौद्धगया येथील महाविहाराच्या नियंत्रण आणि व्यवस्थापनाच्या संदर्भात स्थानिक पातळीवर जोरदार आंदोलने सुरू आहेत हे महाविहार बौद्ध भिक्खूंच्या हाती देण्यात यावे अशी मागणी आहे.
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती-परंपरांचा संकल्प, अशा होळी सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे.
आपला जन्म कसा झाला हे कोणीही सांगते. पण, आईचा जन्म कसा झाला, हे मला सांगू वाटले. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला नायक म्हणून कोणी दाखवलेच नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला असून हा आराखडा कायमस्वरुपी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर केला असून याद्वारे राज्याच्या प्रगतीचा आलेख चढता राहणार आहे.
सातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मल्हारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व नऊ गाळे तसेच कार्यालयालगतचे दोन असे तब्बल बारा गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले.
सातारा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून सोमवारी गुरुवार परज येथील पत्र्याचे शेड, टपऱ्या व अतिक्रमणे हटवून हे मैदान अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले.