महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार तसेच जिल्हा परिषद साताराने विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराचे संस्थापक समाजभूषण-दलितमित्र स्वर्गीय शिवराम माने (गुरूजी) यांच्या तृतीय पुण्यस्मृतीदिनानिमित्त विविध अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सातारा विधानसभा मतदारसंघातील निर्विवाद यशामुळे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सातार्यात श्री काळाराम मंदिर येथील श्रीरामाला अभिषेक आणि महाआरती करण्यात आली.
गोडोली येथील भागामध्ये पाणी टँकर उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून पालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी प्रशांत निकम गोडोलीचे माजी नगरसेवक शेखर मोरे यांच्यात जोरदार हमरातुमरी झाली.
शहरातील विविध ठिकाणच्या मंडईसह मुख्य बस स्थानकानजीकच्या शेतकऱ्यांच्या मंडईतही कांद्याचा भाव वधारला आहे. यामुळे कांदा खरेदीत गृहिणी आखडता हात घेऊ लागल्या आहेत. दुसरीकडे घाऊक बाजारात कांद्याच्या दराची चढती कमान राहिल्याने किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याचा समावेश असलेल्या पदार्थांचे तूर्तास दर वाढवले आहेत.
कारखानदार आमदार झाल्यानंतर तरी शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे व वेळेत उसाचे पैसे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात बहुतांशी कारखाने सुरू होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला आहे.
गेल्या काही वर्षांपासून यूरिक अॅसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याचा चुकीचा सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्यात.
पोवई नाका येथील शू बॉक्स या दुकानाला वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अचानक आग लागली. ही घटना सायंकाळी पावणे आठच्या वेळेस घडली. आगीने रौद्ररूप धारण केले होते, मात्र तेथे कर्तव्यावर तैनात असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने वीज पुरवठा खंडित करून पाण्याने ही आग विझवली.
क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक व शिवाजी उदय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणराव सदाशिवराव तथा बबनराव उथळे (आण्णा), (वय ९८) यांचे काल सोमवारी रात्री ९.३० वाजता वार्धक्याने सातारा येथे निधन झाले.
फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे निष्णाई देवी ग्राहक सहकारी संस्थेच्या असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानमधून २0१0 पासून मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे.
महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर सध्या खल सुरू असून, याबाबतच्या निर्णयानंतरच शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.