सातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्या होमगार्ड मध्ये जवान असणार्या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती.
जिल्हयाची अर्थवाहिनी आणि सर्वसामान्यांची बँक असा नावलौकिक असलेल्या जनता सहकारी बँक साताराच्यावतीने सायबर सिक्युरिटी या विषयावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे लष्कर पाणी पुरवठा केंद्रामार्फत पुरवठा होणाऱ्या ग्राहकांकडे 5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त पाणी देयक थबाकी आहेत, अशा सर्व ग्रहाकांनी पाणी देयके 15 डिसेंबर पर्यंत भरावीत, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र. 1 चे उपविभागीय अभियंता यांनी केले आहे.
हिवाळा सुरु झाला असून अनेक ठिकाणी कडक्याची थंडी पडायला लागली आहे. हिवाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक आजार डोक वर काढतात. सर्दी, खोकला, फ्लू सारखे आजार अनेकांना होत असतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी लागते.
युवा कार्यकर्त्यांचे प्रभावी संघटन कौशल्य, शेतकरी व महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन, मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन, तसेच सामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आ. मनोज घोरपडे यांनी केलेले कार्य डोळ्यांसमोर ठेवून जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले आहे, असे मत प्रा. दशरथ सगरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण कराणारे आहेत. यासंदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष आंदोलन केले.
वर्षानुवर्षे बंद असलेल्या टपऱ्यांच्या विरोधात सातारा पालिकेने कारवाईचे हत्यार उपसले आहे. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने दुपारी बाराच्या दरम्यान दोन तास कारवाई करून दहा टपऱ्या जप्त केल्या.
शिरवळ येथील शिंदेवाडी परिसरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताकडून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली.
जिल्ह्यात थंडीचा कडाका कमी झाला आहे. हवामानात बदल होत असून, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. पावसाची शक्यता व ढगाळ हवामान यामुळे रब्बीतील कांदा, गहू, ज्वारी तसेच बारमाही हळद, आले आदी पिकांना रोगराईचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
शहर व जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो, असे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटर तर्फे आयोजित २०२४” हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत भव्यदिव्य प्रदर्शन जिल्हा परिषद ग्राऊंन्ड, सातारा येथे दिनांक २६, २७, २८, २९ डिसेंबर, २०२४ यावेळी (सकाळी १०.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत) आयोजित केले आहे.