प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देवून पोषण आहाराची चव चाखणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना गाळपास येणार्या ऊसला उच्चतम दर देत आहे. सभासद शेतकर्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न कारखाना व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवले आहे.
एअर मार्शल सुनील काशिनाथ विधाते, AVSM, YSM, VM, एअर ऑफिसर-इन-चार्ज पर्सोनेल (AOP) यांनी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी आपल्या मातृसंस्थेला म्हणजेच सैनिक स्कूल सातारा येथे भेट दिली.
जावली तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू म्हणून प्रतापगड साखर काराखान्याची आोळख आहे. सभासद शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर मिळावा आणि त्यांचे आर्थिक जीवनमान उंचवावे, हे स्वर्गिय लालसिंगराव शिंदे यांचे स्वप्न अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाच्या व्यवस्थापनाकडून सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केला आहे.
दिनांक 6 ऑगस्ट रोजी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सहकारी सुशील दादा मोझर यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या दिवशी कुणीही फ्लेक्स बॅनर व कोणताही कार्यक्रम आयोजित करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मातीतून कलाकृती घडवणाऱ्या साताऱ्याच्या एका लेकीला थेट देशाच्या राजधानीतून मानाचे बोलावणे आले आहे. परळी (ता. सातारा) येथील महिला उद्योजिका सौ. अंजना शंकर कुंभार यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये अनेक महापुरुषांचे योगदान राहिले आहे. आज आपण अशा महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांना अभिवादन करतो.
विविध शैक्षणिक-सामाजिक उपक्रमांसाठी सुपरिचीत असणार्या आणि महाराष्ट्र शासनासह, जि. प. साताराने विविध पुरस्कार प्रदान करुन गौरविलेल्या, श्री. जानाई मळाई शिक्षण संस्था साताराने संस्थेचे हितचिंतक-मार्गर्दाक-आधारस्तंभ, कोरेगांव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार ना. महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे अतिभव्य रक्तदान शिबीराचे आयोजन संस्थेच्या लोकमान्य विद्यामंदिर, माने कॉलनी, एम.आय.डी.सी. सातारा.
क्रांतिची सुरुवात सातार्यातून करुन ब्रिटीशांना सळो की पळो करुन देशातील पहिले स्वातंत्र्य सातार्याला मिळवून दिले. त्या पत्रीसरकारच्या चळवळीचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक लेखन झाले, पुस्तके झाली. परंतु चित्रपट असा तयार झालेला नव्हता.
रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वेलबीईंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने, रोटरी फाउंडेशनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये सुमारे ४८ लाख रुपयांची नवीन उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहे.