महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अॅग्रीस्टॅक योजना दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ पासून राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे.
चिखली, ता. सातारा येथे आज शाळेत निघालेल्या लहानग्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’वरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या उपक्रम सुरू केला आहे.
जागतिक वारसास्थळ असणार्या कास पठारावर युनेस्कोच्या अभ्यासकांची टीम दाखल झाली आहे. या टीमकडून कास पठारावर लुप्त पावत चाललेल्या दुर्मीळ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती घेऊन त्यांचे पुनरुर्जीवन कसे करता येईल? याचा अहवाल युनेस्कोला सादर करण्यात येणार आहे.
राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
बदलीत लाभ मिळण्यासाठी दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी सुरूच असून आणखी १२ गुरुजींचे प्रमाणपत्र अपात्र असल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने १०० टीएमसीकडे वाटचाल सुरू केली आहे.
गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे.
सातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत.
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने रविवारी सकाळी सज्जनगड रन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.