खंडाळा- शिरोळ या मार्गाचा भाग असलेल्या पिंपोडे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल स्वातंत्र्यदिनी एकत्र येत सातारा-लोणंद मार्गावर पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे रास्ता रोको आंदोलन केले.
सातारा शहरातील महामार्गालगत 'वास्तू प्लाझा' या इमारतीमध्ये बंद फ्लॅट फोडणार्या पुणे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीतील एक चोरटा इमारतीवरुन पडून ठार झाला.
जिल्ह्यातील सहकारी संस्थांची मातृसंस्था, आपल्या उत्तम प्रशासन, उत्कृष्ठ कार्यपध्दती व सुयोग्य नियोजनामुळे राज्यातच नव्हेतर देशात सहकार क्षेत्रातील बँकिंगमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चांगली प्रगती केलेली असून या बँकेची 75 वी वार्षिक साधारण सभा शनिवार दि. 16 रोजी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
वाई पोलीस उपविभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले आहे, तसेच जिल्ह्यातील दोन पोलिसांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मिळाले आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुतनीकरण करुन त्या ठिकाणी पालकमंत्री कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
राजधानी साताऱ्यात तब्बल ३२ वर्षानंतर ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मसाप शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनच्या वतीने हे संमेलन होणार असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे.
सातारा जिल्हयात दिनांक 8 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गोकुळअष्टमी, दहिहंडी, गणेश मुर्ती आगमन, गणेश मुर्ती विसर्जन, गणेशोत्सव असे उत्सव साजरे होत आहेत.
रान भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीने येतात. रानभाज्या शरिरासाठी अत्यंत पोषक आहेत. त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा, असे आवाहन त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
वाई तालुक्यातील कवठे हे गाव क्रांतिकारी व पुरोगामी विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तहसीलदार यांना कायदेशीर मोजणीद्वारे रस्ता नकाशावर नोंदवून देण्याचे निवेदन दिले होते.
राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.