जुन्या एमआयडीसीतून अज्ञात चोरट्याने बोनेटची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
प्रेम असल्याचे सांगून व लग्न करतो असे सांगून युवतीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद कोरडे याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताच्या आईने युवतीला जातीवाचक बोलल्याने तसा गुन्हाही दाखल झाला आहे.
कॅनॉलमध्ये बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वाढे, ता.सातारा गावच्या हद्दीत पेढे विक्रेत्यांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून मारामारी झाली. यावरुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन शाळेचा गौरव झाला आहे. शासकीय शाळांच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) या शाळेचा कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ (ता. खंडाळा) या शाळेला कोल्हापूर विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला.
राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात महाराष्ट्राने देशात पहिला नंबर पटकावला आहे. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांनी या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या सातव्या राष्ट्रीय पोषण महा सांगता समारंभ झाला. या उपक्रमात राज्यात तृतीय क्रमांकावर कामगिरी केलेल्या सातारा जिल्हा परिषदेचाही सत्कार करण्यात आला.
ज्यांच्याकडे सांगण्यासाठी काही नसते, त्यांना काही ना काही कृप्त्या लढवाव्या लागतात. मी माझ्या मतदारसंघात एवढे काम केले आहे की मला विरोधकांबाबत बोलण्यासाठी वेळ नाही. लोकांच्या हिताचे आणि विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळेच मतदारसंघातील माझ्या बहिणी, नागरिक माझ्यावर प्रेम करीत आहेत. तसेच रामराजे कधीच कोणाचे नाहीत. शरद पवारांनी त्यांना नाव दिले, त्यांना त्यांनी सोडले.
रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प ट्रस्ट संचलित आनंदबन मतिमंद मुलांचे व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामधील १८ वर्षांच्या पुढील प्रौढ विशेष मुलांनी बनवलेल्या "रोटरी दिवाळी कीट" चे उद्घाटन श्रेणीकभाई शाह- व्यवस्थापक- म्हसवडकर सराफ- सातारा यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले. या कीटला सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तुम्ही काही चिंता करू नका. काही झालं तरी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात महाराष्ट्रात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फलटण येथे सांगितले.