गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातारारोड-पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला.
भारतीय जनता पार्टीच्या सातार्यातील कार्यकर्ते-पदाधिकार्यांनी आज सातार्यात जल्लोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला.
वाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.
सातारा पोलिसांनी सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे मारत धडक कारवाई केली आहे.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये जनावरांची वाहतूक करणाऱ्या कुरेशी टोळीला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी हे आदेश दिले. तौफिक इम्तियाज कुरेशी वय 23, ईलाही हुसेन कुरेशी वय 25, अरबाज इम्तियाज कुरेशी वय28, ईनायत हुसेन कुरेशी वय 27 सर्व राहणार कुरेशी नगर, मंगळवार पेठ, फलटण या चौघांना हद्दपार प्राधिकरणाने तडीपार केले आहे.
शिवछत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात आयोजित राजधानी रास दांडियाचे सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिनी नागराजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रास दांडियाच्या पहिल्या दिवशी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 9 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून घेतल्या जाणार आहेत, याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. राज्य निवडणूक समन्वय समितीचे राज्य सदस्य प्राध्यापक सोमनाथ साळुंखे या मुलाखती घेणार आहेत.
सातारा जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातार्यात व्हावे, यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयाचे रंगकर्मींनी स्वागत केले आहे.
केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही. परिणामी शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरिता सातार्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.