बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जय अंबे, जगदंबे ..च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे मक्तेदारी राहिली आहे. अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. परंतु आता बदल होऊ लागले आहे. भारतासारखे विकसनशील देश महासत्ताक असलेल्या अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करत आहेत. भारत आता ग्लोबल रिसर्च पॉवर हाउस बनला असल्याचा अहवाल ऑस्ट्रेलियन स्ट्रेटजिक पॉलिसी इंस्टीट्यूटने दिला आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोघं लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. नाग चैतन्यने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
माहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील विभागप्रमुख (न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स) कुमारी राजेश्वरी व्ही शेट्टी यांचा लेख
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी दिव्यांग बांधवांनी तेथेच बसकन मारली.
सहकार क्षेत्रात काम करणार्या बँकांनी वित्तीय क्षेत्रात जर काटेकोरपणा पाळला तर त्याचा फायदा सहकारामध्ये काम करणार्या बँका, विकास सेवा सोसायटी यांना होऊन त्याची फळे प्रत्यक्षपणे शेतकर्यांना मिळतात. सातारा जिल्हा बँकेने शेतकर्याचे जीवनमान उंचावले आहे. गेली 17 वर्षे बँकेचा एनपीए शून्य आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काटेकोरपणे आर्थिक नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून केले.