माची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मुजमील हमीद पालकर वय 40 रा. गुरुवार परज असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जाब विचारल्याप्रकरणी अहिरे कॉलनी देगाव रोड संभाजीनगर येथील अश्विन गायकवाड वय 43 या केबल व्यवसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुषार जाधव राहणार सृष्टी अपार्टमेंट संभाजीनगर व त्याच्या पाच सहा साथीदारांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा पोलिसांनी तडीपार केलेला मनोज नामदेव पवार हा गुन्हेगार पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सातारा शहर पोलिसांनी सदर बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा मारुन एकावर कारवाई केली आहे.
विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
वाई औद्योगिक वसाहती मधील आर्यन प्रीमियम ऑलिबँक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून एकाने कंपनीतील 17 लाख 65 हजार रुपये किमतीची साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रविंद्र पांडुरंग पोपळे रा. यादोगोपाळ सातारा यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
दहिवडी तालुका माण गावाच्या हद्दीतील गोंदवले रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दहिवडी येथील तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. किशोर सत्यवान लोखंडे आणि त्यांचे चुलत भाऊ किरण लोखंडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.
किरकोळ कारणावरून दमदाटी करणार्या रामकुंड सदर बाजार येथील इसमावर सातारा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी अलीम रस्तुम शेख वय 28 राहणार 486 गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.
मी बारामतीला मुजरा करत नाही, म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे. माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणार्यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.