अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 हा मानवी संरक्षणार्थ असणारा अत्यंत महत्वाचा कायदा आहे. याचा वापर या समाजातील घटकांच्या संरक्षणार्थ प्रभावीपणे झाला पाहिजे.
कळंभे, तालुका वाई याठिकाणी भव्य अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सातारा कारागृहामधील बंदीवानांनाच्या मनातील वाईट विचार, भावना नष्ट व्हावी या हेतूने श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा कारागृहास भेट देऊन कारागृहामध्ये बसवण्यात आलेल्या श्री गणेशाची आरती केली.
केंद्र व राज्यातील सरकार हे जनहिताच्या विरोधात अनेक निर्णय घेत आहे आणि जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत असल्याचा थेट आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच चे विधिज्ञ एडवोकेट असीम सरोदे यांनी सातारा येथे बोलताना केला.
पुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे, तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. ना. देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील.
सातारा शहर परिसरातील लिंब नागेवाडी येथे आयटी पार्कसाठी तब्बल 46 हेक्टर शासकीय जागा उपलब्ध आहे. सातार्यामध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी या जागेचे ड्रोन सर्वेक्षण शुक्रवारी सातारा औद्योगिक महामंडळाच्या वतीने करण्यात आले.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात काल मंगळवारी अनेक गणेश भक्तांनी बुधवारी गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या गणेश मुर्ती मोठ्या उत्साहात आणि मोरयाच्या जयघोषात घरी आणल्या.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकाच्या घरातून रोकड व सोन्याचा ऐवज लंपास करणार्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून रोकड व सोन्याचा ऐवज असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागरिकांना देय असणाऱ्या योजना घरबसल्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी व आवश्यक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला उपक्रम राज्यात प्रथमच सातारा जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.