देवदिवाळीचे औचित्य साधून लांजा तालुक्यातील साटवली गांगोवाडी येथील तरुणांनी एकत्रित येत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साटवली गढी येथे हजारो दीपोत्सव प्रकाशित केले आणि देवदीपावली साजरी केली. त्यामुळे दिव्यांच्या प्रकाशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली साटवली गढी उजळून निघाली होती.
सविस्तर वृत्तग्रामविकासामध्ये प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्यावतीने देशपातळीवर देण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले असून तें आचरणात आणण्याची आपली जबाबदारी असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन अभिवादन केले.
सविस्तर वृत्तभारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे. चैत्यभूमीवर दर्शनासाठी हजारो लोक दादर आणि परळ रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत.
सविस्तर वृत्तओला, उबेर, यांसारख्या खासगी अॅपच्या माध्यमातून धावणार्या प्रवासी वाहनांसाठी राज्याची स्वतंत्र अॅग्रिगेटर पॉलिसी तयार करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्याला दिले होते.
सविस्तर वृत्तमाण तालुक्यातील म्हसवड परिसरात ऊसतोड सुरू आहे. देवापूर, पळसावडे, म्हसवड, हिंगणी, ढोकमोड, शिरताव, वर-मलवडी, गंगोती, पानवण, वडजल, दिवड, पळशी व म्हसवड परिसरातील ऊस वाहतूक म्हसवड-दहिवडी या मुख्य रस्त्यावरुन होत आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना अजित पवार गटाच्या वतीने संपर्क करण्यात आल्याचे समजते. एका महिला पदाधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आली असून काही खासदारांशी चर्चा झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सविस्तर वृत्तसंपूर्ण राज्याला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अखेर तो क्षण महाराष्ट्राने अनुभवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमक्ष त्यांनी शपथ ग्रहण केली.
सविस्तर वृत्तकोस्टल रोडमुळं मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका झाली आहे. वेगवान प्रवासामुळं प्रवाशांचा वेळ वाचतोय. आता मरिन लाइन्स ते वांद्रेदरम्यानच्या कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासह त्यांच्या विविध समस्यांसाठी विधानसभेमध्ये निश्चित पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही, कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त